‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ अभियानांतर्गत ग्रामपंचायत वळके येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ अभियानांतर्गत ग्रामपंचायत वळके येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व, महिला सक्षमीकरण आणि लिंगसमतेवर प्रभावी विचार मांडले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासोबतच समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संदेश देण्यात आला.